माय मराठी

ज्या भाषेने मला बोलायला शिकवले,
हसायला शिकवले....
जगायला शिकवले....
तिच्यासाठी.....

या ब्लॉग वरील कविता माझ्या नाहीत, हा कवितांचा एक संग्रह आहे. तरी एखाद्या कॉपी राईट चा भंग होत असल्यास कृपया ajaynarewade@yahoo.co.in वर ईमेल करावा. ती कविता लगेच काढून टाकण्यात येईल. आणि त्यामधून आपणास झालेल्या मन:स्तापाबद्दल क्षमा असावी....

---- अजय नरेवाडे


Showing posts with label समर्थ रामदास. Show all posts
Showing posts with label समर्थ रामदास. Show all posts
धर्मवीर संभाजीला उपदेश


संभाजी महाराजांना रामदास स्वामी लिहितात-

अखंड सावधान असावें। दुश्चित कदापि नसावें।

तजविजा करीत बैसावें। एकांत स्थळी।।

मागील अपराध क्षमावे। कारबारी हातीं धरावे।

सुखी करून सोडावे । कामाकडे।।

श्रेष्ठीं जे जे मेळविले। त्यासाठी भांडत बैसले।

मग जाणावें फावलें। गलिमांसी।।

बहुत लोक मिळवावे। एक विचारे भरावे।

कष्ट करोन घसरावें। म्लेंच्छांवरी।।

आहे तितुके जतन करावें। पुढें आणिक मिळवावें।

महाराष्ट्र राज्य करावें। जिकडे तिकडे।।

शिवराजास आठवावें। जीवित्व तृणवत् मानावें।

इहपरलोकी रहावें। कीतीर्रूपे।।

शिवराजाचे आठवावे रूप। शिवराजाचा आठवावा प्रताप।

शिवराजाचा आठवावा साक्षेप । भूमंडळी।।
जाणता राजा

निश्चयाचा महामेरु । बहुत जनांसी आधारु ।
अखंड स्थितीचा निर्धारु । श्रीमंत योगी ॥

परोपकाराचिये राशी । उदंड घडती जयासी ।
तयाचे गुणमहत्त्वासी । तुळणा कैची ॥

यशवंत कीर्तिवंत । सामर्थ्यवंत वरदवंत ।
नीतिवंत पुण्यवंत । जाणता राजा ॥

आचारशीळ विचारशीळ । दानशीळ धर्मशीळ ।
सर्वज्ञपणे सुशीळ । सकळां ठायी ॥

नरपति हयपति गजपति । गडपति भूपति जळपति ।
पुरंदर आणि शक्ती । पृष्ठभागीं ॥

धीर उदार गंभीर । शूर क्रियेसि तत्पर ।
सावधपणे नृपवर । तुच्छ केले ॥

तीर्थेक्षेत्रे मोडिली । ब्राह्मणस्थाने भ्रष्ट जाली ।
सकळ पृथ्वी आंदोळली । धर्म गेला ॥

देव-धर्म-गोब्राह्मण । करावया संरक्षण ।
हृदयस्थ जाला नारायण । प्रेरणा केली ॥

उदंड पंडित पुराणिक । कवीश्वर याज्ञिक वैदिक ।
धूर्त तार्किक सभानायक । तुमच्या ठायी ॥

या भूमंडळाचे ठायी । धर्मरक्षी ऐसा नाही ।
महाराष्ट्रधर्म राहिला काही । तुम्हां कारणे ॥

आणिकही धर्मकृत्ये चालती । आश्रित होऊन कित्येक राहती ।
धन्य धन्य तुमची कीर्ती । विश्वीं विस्तारिली ॥

कित्येक दुष्ट संहारिले । कित्येकांसी धाक सुटले ।
कित्येकांस आश्रय जाले । शिवकल्याण राजा ॥

तुमचे देशी वास्तव्य केले । परंतु वर्तमान नाही घेतले ।
ऋणानुबंधे विस्मरण जाले । काय नेणो ॥

सर्वज्ञ मंडळी धर्ममूर्ती । सांगणे काय तुम्हाप्रती ।
धर्मसंस्थापनेची कीर्ती । सांभाळिली पाहिजे ॥

उदंड राजकारण तटले । तेणे चित्त विभागले ।
प्रसंग नसता लिहिले । क्षमा केली पाहिजे ॥


समर्थ रामदासांनी छत्रपतींस लिहीलेल्या पत्रातून...

जाणता राजा

जाणता राजा
जाणता राजा