माय मराठी

ज्या भाषेने मला बोलायला शिकवले,
हसायला शिकवले....
जगायला शिकवले....
तिच्यासाठी.....

या ब्लॉग वरील कविता माझ्या नाहीत, हा कवितांचा एक संग्रह आहे. तरी एखाद्या कॉपी राईट चा भंग होत असल्यास कृपया ajaynarewade@yahoo.co.in वर ईमेल करावा. ती कविता लगेच काढून टाकण्यात येईल. आणि त्यामधून आपणास झालेल्या मन:स्तापाबद्दल क्षमा असावी....

---- अजय नरेवाडे


समिधाच सख्या या...

दूरस्थ कुणी दे तुझ्या करी ही कविता
वाहते जिच्यातुनि त्याची जीवन-सरिता,
खळखळे, अडथळे, सुके, कधी फेसाळे
परि अखंड शोधे वाट समुद्राकरिता ||

खडकाळ प्रान्त तो ही जेथून निघाली
पथ शोधित आली रानातून अकेली,
नच रम्य राउळे, कलापूर्ण वा घाट
तीरावर तुरळक परि अंकुरती वेली ||

नव पर्णाच्या या विरल माण्डवाखाली,
होईल सावली कुणा, कुणास कहाली,
तोषेल कुणी, शापील कुणी दुर्वास,
"या जळोत समिधा-भव्य हवी वृक्षाली !"

समिधाच सख्या या, त्यात कसा ओलावा,
कोठून फुलापरि वा मकरन्द मिळावा?
जात्याच रुक्ष या, एकच त्या आकांक्षा,
तव आंतर अग्नी क्षणभर तरि फुलवावा ||
एक ही शंभू राजा था

देश धरम पर मिटने वाला।
शेर शिवा का छावा था।।
महापराक्रमी परम प्रतापी।
एक ही शंभू राजा था।।
तेज:पुंज तेजस्वी आँखें।
निकल गयीं पर झुका नहीं।।
दृष्टि गयी पण राष्ट्रोन्नति का।
दिव्य स्वप्न तो मिटा नहीं।।
दोनो पैर कटे शंभू के।
ध्येय मार्ग से हटा नहीं।।
हाथ कटे तो क्या हुआ?।
सत्कर्म कभी छुटा नहीं।।
जिव्हा कटी, खून बहाया।
धरम का सौदा किया नहीं।।
शिवाजी का बेटा था वह।
गलत राह पर चला नहीं।।
वर्ष तीन सौ बीत गये अब।
शंभू के बलिदान को।।
कौन जीता, कौन हारा।
पूछ लो संसार को।।
कोटि कोटि कंठो में तेरा।
आज जयजयकार है।।
अमर शंभू तू अमर हो गया।
तेरी जयजयकार है।।
मातृभूमि के चरण कमलपर।
जीवन पुष्प चढाया था।।
है दुजा दुनिया में कोई।
जैसा शंभू राजा था?।।
धर्मवीर संभाजीला उपदेश


संभाजी महाराजांना रामदास स्वामी लिहितात-

अखंड सावधान असावें। दुश्चित कदापि नसावें।

तजविजा करीत बैसावें। एकांत स्थळी।।

मागील अपराध क्षमावे। कारबारी हातीं धरावे।

सुखी करून सोडावे । कामाकडे।।

श्रेष्ठीं जे जे मेळविले। त्यासाठी भांडत बैसले।

मग जाणावें फावलें। गलिमांसी।।

बहुत लोक मिळवावे। एक विचारे भरावे।

कष्ट करोन घसरावें। म्लेंच्छांवरी।।

आहे तितुके जतन करावें। पुढें आणिक मिळवावें।

महाराष्ट्र राज्य करावें। जिकडे तिकडे।।

शिवराजास आठवावें। जीवित्व तृणवत् मानावें।

इहपरलोकी रहावें। कीतीर्रूपे।।

शिवराजाचे आठवावे रूप। शिवराजाचा आठवावा प्रताप।

शिवराजाचा आठवावा साक्षेप । भूमंडळी।।
यावन रावनकी सभा शंभु बंध्यो बजरंग ।

लहू लसत सिंदूरसम खूब खेल्यो रणरंग ।

रबि छबि लखत खयोत बदरंग ।

राजन् तव तेज निहारके लखत त्यजो अवरंग ।।

(मराठी अर्थ :- यवनरूपी रावणाच्या दरबारात हे शंभूराजा तू बांधलेल्या बजरंगासारखा दिसतो आहेस. बजरंगाच्या शरिरावर शेंदूर असतो त्याप्रमाणे तुझ्या शरिरावर रक्‍त पसरलेले आहे. आकाशात सूर्य उगवल्यावर काजवे निस्तेज होतात त्याप्रमाणे तुझ्या आगमनामुळे औरंग्याने तख्ताचा त्याग केला आहे)
हे राजे


ओ.....ओ....ओ..... हर हर महादेव
हे राजे जीर जीर जी राजे हे जी जी || 2 ||
ओ.....ओ....ओ.....
हे राजे जीर जीर जी राजे हे जी जी
झटकून टाक ती राख नव्याने जाग,
पेटू दे आग मराठी आता.... || 2 ||
डोळ्यात फुटे अंगार भगवे रक्तात,
जागू दे आज भवानी माता...
हे राजे जीर जीर जी राजे हे जी जी || 2 ||
हर हर महादेव

प्रतिपशचंद्रा लेखेव वारधहीशणूर विश्ववंदीता,
शहसणोह शिवसैश्या मुद्राभद्राय राज्याते,
हृदयात जागू दे पुन्हा आता रांगडा जोश,
दाही दिशी घुमू दे शिवछत्रपतिन्चा घोष || 2 ||
लढण्या संग्राम आज हा,
बळ दे ह्या मानघटी आम्हा,
करण्या संहार शत्रूचा, जन्म घे पुन्हा आता
हे राजे जीर जीर जी राजे हे जी जी || 2 ||

असतो मा सडगामय तामासोमा ज्यॉथिर्गमया || 2 ||
मृतयोमा अमृतो गमय,
उठा आणि पुन्हा आपल्या धमन्यात खेळवा
मराठीयांच सळसळात रक्त...
तलवार नाचते रणी
ऐसा पेटतो राग, जगो मरो जीव हा फुले
महाराष्ट्राची बाग, ||2 ||

जगण्या सिद्धांत आज हा, शक्ति दे शतपती आम्हा,
चाल चाल रे ऊठ घालते
साद मराठी आता,
हे राजे जीर जीर जी राजे हे जी जी || 2 ||
झटकून टाक ती राख नव्याने जाग,
पेटू दे आग मराठी आता.... || 2 ||
डोळ्यात फुटे अंगार भगव रक्तात,
जागू दे आज भवानी माता...
हे राजे जीर जीर जी राजे हे जी जी || 2 ||
हर हर महादेव
हे राजे जीर जीर जी राजे हे जी जी || 2 ||
सरदार, रजपूत, ठाकूर याप्रमाणे घाटी हा शब्दसुद्धा
अदबिने घ्यायला प्रवृत्त करा लोकांना
हे राजे जीर जीर जी राजे हे जी जी || 2 ||
पहाताची होती दंग आज सर्व संत २
विठ्ल्लाच्या पायी विट झाली भाग्यवंत ३
युगे अठाविस उभा विठू विटेवरी ,
धन्य झाली चंद्रभागा धन्य ती पंढरी,
अनाथांचा नाथ हरी असे दयावंत 2
विठ्ल्लाच्या ..............................
कोणती ती होती माती कोण तो कुंभार,
घड्विता उभा राही तो हा विश्वम्बर,
तुझ्यामुले पंढरपुर झाले कीर्तिवंत २
विठ्ल्लाच्या ..............................
पाहुनिया विटेवरी विठू भगवंत,
दत्ता म्हणे मन माझे झाले येथे शांत,
गुरुकृपे साधियेला मी हाच सुख: अंत २
विठ्ल्लाच्या ..............................
आम्ही कोण म्हणूनि काय पुससी? आम्ही असू लाडके-
देवाचे दिधले असे जग तये आम्हांस खेळावया;
विश्वी या प्रतिभाबले विचरतो चोहीकडे लीलया,
दिक्कालांतुनि आरपार अमुची दृष्टी पहाया शके

सारेही बडिवार येथिल पहा! आम्हांपुढे ते फिके;
पाणिस्पर्शच आमुचा शकतसे वस्तूंप्रती द्यावया -
सौंदर्यातिशया, अशी वसतसे जादू करांमाजि या;
फोले पाखडिता तुम्ही, निवडितो ते सत्त्व आम्ही निके!

शून्यामाजि वसाहती वसविल्या कोणी सुरांच्या बरे?
पृथ्वीला सुरलोक साम्य झटती आणावया कोण ते?
ते आम्हीच, सुधा कृतींमधुनिया ज्यांच्या सदा पाझरे;
ते आम्हीच शरण्य, मंगल तुम्हां ज्यांपासुनी लाभते!

आम्हांला वगळा – गतप्रभ झणी होतील तारांगणे;
आम्हांला वगळा – विकेल कवडीमोलावरी हे जिणे!

- केशवसुत
म्लेंच्छ चतुरंगपर शिवराज देखीये


शक्र जिमि शैलपर,
अर्क तमफैलपर,
बिघन की रैलपर,
लंबोदर देखीये !

राम दसकंधपर,
भीम जरासंधपर,
भूषण ज्यो सिंधुपर,
कूंभज विसेखिये !

हर ज्यो अनंगपर,
गरुड ज्यो भूज़ंगपर,
कौरवके अंगपर,
पार्थ ज्यो पेखीये !

बाज ज्यो बिहंगपर,
सिंह ज्यो मतंगपर,
म्लेंच्छ चतुरंगपर,
शिवराज देखीये !!

शिवराज देखीये !! शिवराज देखीये !!
शिवराज देखीये !! शिवराज देखीये !!

--कवीराज भूषण
'शेर शिवराज है'


इंद्र जिमि जृंभपर !
बाडव सुअंभपर !
रावण सदंभपर !
रघुकुल राज है !!

पौन वारिवाह पर !
संभु रतिनाह पर !
ज्यो सहसवाह पर !
राम द्विज राज है !

दावा दृमदंड पर !
चिता मृगझुंड पर !
भूषण वितुंड पर !
जैसे मृगराज है !!

तेज तमंअंस पर !
कन्न्ह जिमि कंस पर !
त्यों म्लेंच्छ बंस पर !
शेर शिवराज है !!

शेर शिवराज है !!
शेर शिवराज है !!
शेर शिवराज है !!
शेर शिवराज है !!

कवीराज भूषण.
कुंद कहा, पयवृंद कहा !


कुंद कहा, पयवृंद कहा, अरूचंद कहा सरजा जस आगे ?
भूषण भानु कृसानु कहाSब खुमन प्रताप महीतल पागे ?
राम कहा, द्विजराम कहा, बलराम कहा रन मै अनुरागे ?
बाज कहा मृगराज कहा अतिसाहस मे सिवराजके आगे ?

अर्थ :- कुंद कहा, पयवृंद कहा !
अर्थ :- कुंद, दुध व चंद्र यांची शुभ्रता शिवरायांच्या यशासमोर काय आहे ? (१), पृथ्वीवर पसरलेल्या शिवरायांच्या प्रखर प्रतापापुढे सुर्य व अग्नी यांच्या तेजाचा काय पाड ? (२), समरप्रियतेमध्ये दाशरथी राम, परशूराम व बलराम हे देखिल शिवरायांच्या मागेच होत.(३) आणि धाडस पाहिले असता बाज (बहिरी ससाणा - पक्ष्यांवर झेप घेणारा) व सिंह हे शिवरायांच्यापुढे तुच्छ होत. (४)
शाइस्तेखान.....


दच्छिन को दाबि करि बैठो है ।
सईस्तखान पूना मॉंहि दूना करि जोर करवार को ॥

हिन्दुवान खम्भ गढपति दलथम्भ ।
भनि भूषन भरैया कियो सुजस अपार को ॥

मनसबदार चौकीदारन गंजाय महलनमें ।
मचाय महाभारत के भार को ॥

तो सो को सिवाजी जे हि दो सौ आदमी सों ।
जीत्यो जंग सरदार सौ हजार असवार को ॥

अर्थ :-

शाइस्तेखान दक्षिण हस्तगत करून पुण्यात ठाणे देऊन बसला. या वेळी हिंदूंचा आधारस्तंभ व किल्लेदारांच्या एका सेनानायकाच्या तरवारीस जोर चढला अन् त्याने अपार सुकिर्ती मिळवली. (ती अशी मिळवली की)

मोठमोठ्या मनसबदारास व चौकिदारास जखमी करून त्याने महालांत शिरून महाभारत माजवण्यास (युद्ध करण्यास) सुरुवात केली !

भूषण म्हणतो, कि हे शिवराया, तुझ्या शिवाय दुसरा पराक्रमी कोण आहे ? ज्याने फक्त दोनशे माणसांनिशी लाख स्वार असणार्‍या सरदाराबरोबरचे युद्ध जिंकले.
सिवा नरेस भ्रकुटी चढाई है....


प्रेतिनी पिसाच रु निसाचर निसाचरि हू, मिलि मिलि आपुसमे गावत बधाई है ।
भैरों भूत प्रेत भूरी भूधर भयंकर से, जुत्थ जुत्थ जोगिनी जमाती जुरि आई है ।
किलकि किलकि कै कुतूहल करति काली, डिमडिम डमरू दिगंबर बजाई हैं ।
सिवा पूंछै सिव सों "समाजु आजु कहॉ चली", काहू पै सिवा नरेस भ्रकुटी चढाई है ॥

अर्थ :- (या छंदात भूषण कवीने काल्पनिक शिव - पार्वती संवाद वर्णिलेला आहे)

प्रेते, पिशाच्चे, राक्षस, राक्षसी जमून आपापसात आनंदाने गात आहेत. पर्वताप्रमाणे धिप्पाड शरीरे धारण करणारे भैरव, तसेच भूते, प्रेते यांच्या झुंडीच्या झुंडी जमू लागलेल्या आहेत, कालीदेवता किल किल शब्द करून जमलेल्या समाजाचे कौतुक करीत आहे, आणि महादेव आनंदाने डमरू वाजवत आहे. हा शिवगणाचा आनंद पाहून पार्वतीने महादेवास विचारले,
" महाराजा, आज आपली मंडळी कुठे निघाली आहेत ?"
महादेव म्हणाले,
" आज, शिवराज कोणा शत्रुवर कृद्ध झालेले आहेत."
नरसिंह सिवा है........
एक कहे कल्पद्रुम है, इमि पूरत है सबकी चितचाहे ।
एक कहे अवतार मनोज, की यो तनमे अति सुंदरता है ।
भुषण एक कहे महि इंदु यो, राजविराजत बाढयौ महा है ।
एक कहे नरसिंह है संगर, एक कहे नरसिंह सिवा है ॥

- कविराज भुषण

अर्थ :-
यास कोणी कल्पवृक्ष म्हणतात, कारण हा सर्वांचे मनोरथ पूर्ण करतो.
हा सौंदर्यसंपन्न असल्याने कोणी याला मदनाचा अवतार म्हणतात.
भुषण याला पृथ्वीवरचा चंद्र म्हणतो, कारण याचे राज्य कलेकलेने वाढत आहे.
कोणी याच्या युद्धातील पराक्रमामुळे यास सिंह म्हणतात तर कोणी प्रत्यक्ष नृसिंह भगवानच समजतात.
कारण ज्याप्रमाने नरसिंहाने हिरण्यकशपुचे पोट फाडले तद्वातच शिवरायांनी आपल्या वाघनखांनी अफजलखानाची आतडी काढली.
गर सिवाजी न होते तो...............
देवल गिराविते , फिराविते निसान अली ।
ऐसे डूबे रावराने , सबी गए लबकी ।
गौर गणपती आप , औरनको देत ताप ।
आपनी ही बार सब , मारी गये दबकी ।
पीरा पैगंबर , दिगंबर दिखाई देत ।
सिद्ध की सिद्धाई गई , रही बात रब की ।
कासी की कला गई, मथुरा मस्जिद भई ।
गर सिवाजी न होते तो , सुन्नत होती सबकी ॥

- कविराज भूषण.

मराठी अर्थ :-

यवनांनी मंदिरे पाडून त्या जागी अल्लाचा ध्वज फडकविला तेव्हा राव - राणे (राजे महाराजे) भयग्रस्त व पतित होऊन तोंडदेखील बाहेर काढत नव्हते. इतके ते निर्बल व निस्तेज झाले. थोडेसे पुजा विधान चुकले तर भक्तांनाच ताप देणार्या देवी, गणपती आदि देवदेवतांना आपल्यावरील या यावनी संकटांचा प्रतिकार करणे अशक्य वाटून लपून बसण्याची वेळ आली. सिद्धांची सिद्धि समाप्त होवून 'रबची' चर्चा सुरू झाली. जिकडे तिकडे पीर, पैगंबर, फकीर, अवलिया यांचेच साम्राज्य पसरलेले होते. काशी कळाहीन झाली, मथुरेला मशीद उभी राहीली, अशा स्थितीत जर शिवाजी महाराज झाले नसते, तर सर्व हिन्दुंची सुन्ता झाली असती.
राखी हिन्दुवानी, हिन्दुवानको तिलक राख्यो |अस्मृती पुराण राखे वेदविधि सुनी मैं ||
राखी रजपुती , रजधानी राखी राजन की |धरामे धर्म राख्यो , राख्यो गुन गुनी मैं ||
भूषण सुकवि , जीती हद्द मरह्टट्न की |देस देस कीर्ति , बरवानी तव सुनी मैं ||
साही के सपूत , सिवराज समशेर तेरी |दिल्ली दल दाबी कै, दिवाल राखी दुनी मैं ||
वेद राखे विदित , पुराण राखे सारयुत |रामनाम राख्यो , अति रसना सुघर मैं ||
हिन्दुन की चोटी, रोटी राखी है सिपहीन की |कान्दे मैं जनेऊ राखे , माला राखी गर मैं ||
मिडी राखे मुगल , मरोरी राखे पातसाह |बैरीपिसी राखे , बरदान राख्यो कर मैं ||
राजन की हद्द राखी , तेगबल सिवराज |देव राखे देवल , स्वधर्म राख्यो घर मैं ||
देवल गिराविते , फिराविते निसान अली |ऐसे डूबे रावराने , सबी गए लबकी ||
गौर गणपती आप , औरनको देत ताप |आपनी ही बार सब , मारी गये दबकी ||
पीरा पैगंबर , दिगंबर दिखाई देत |सिद्ध की सिदधाई गई , रही बात रब की ||
कासी की कला जाती, मथुरा मस्जिद होती |सिवाजी न होते तो , सुन्नत होती सबकी ||
साहि तनै सरजा कि कीरती सों ।
चारों और चाँदनी वितान छिति छोर छाइयतु है ।
भूषन भनत ऐसो भूप भौंसिला है ।
जाको द्वार भिच्छुकन सो सदाई भाइयतु है ।
माहादानी सिवाजी खुमान या जहान ।
पर दान के प्रमान जाके यों गनाइयतु है ।
रजत की हौस किए हेम पाइयतु जासो ।
हयन की हौस किए हाथी पाइयतु है ॥

अर्थ :-

शहाजी पुत्र शिवरायांच्या कीर्तिरूप चांदणीचा मंडप पृथ्वीच्या चहूंकडील टोकापर्यंत पसरला आहे. भूषण म्हणतो, हे भोसलेराज असे आहेत की, भिक्षुकांना नेहमी त्यांच्या द्वाराशी पडून रहावेसे वाटते. या भूतलावर शिवाजी महाराज महान महान दाता असून त्यांच्या दानाचे प्रमाण यावरूनही समजून येते ; की रूप्याची इच्छा केली असता सोने मिळते व घोड्याची इच्छा केली असता महाराजांकडून हत्ती मिळतो.
सिवाजी न हो तो.....


कुंभ कन्न असुर अवतारी अवरंगजेब कीन्ही ।
कत्ल मथुरा दोहाई फेरि रब की ।
खोदि डारे देवी देव सहर महल्ला बाँके ।
लाखन तुरूक कीन्हे छूटि गई तब की ।
भूषन भनत भाग्यो कासीपति विश्वनाथ ।
और कौन गिनती में भूली गति भब की ।
चारो वर्ण धर्म छोडि कलमा निवाज पढि ।
सिवाजी न हो तो सुनति होत सब की ॥
अर्थ :-
भूषण म्हणतो, कुंभकर्ण राक्षसाचा अवतार जो औरंगजेब - त्याने मथुरेची कत्तल करून सर्व शहरात "रब"ची द्वाही फिरवली (मुसलमानी चालविली). शहरातील गल्लोगल्लीतून असलेल्या उत्तम उत्तम देवता खोदून खणून काढल्या. लाखो हिंदुंना बळाने मुसलमान केले, इतकेच काय, प्रत्यक्ष काशी विश्वनाथ भयभीत होउन पळाले, महादेवाची अशी त्रेधा उडाली तेथे इतरांची काय कथा ? अशा भयाण वेळी जर शिवराय नसते तर चारही वर्णांना आपापले धर्म सोडून नमाज पढावा लागला असता व सर्व हिंदुंची सुंता झाली असती.
सरजा सिवाजी जंग जीतन चलत हैं...
साजि चतुरंग बीर रंग में तुरंग चढी ।
सरजा सिवाजी जंग जीतन चलत हैं ।
भूषन भनत नाद बिहद नगारन कें ।
नदी नद मद गैबरन के रलत हैं ।
ऐल फैल खैल भैल खलक में गैल गैल ।
गजन की ठैल पैल सैल उसलत हैं ।
तारा सो तरनि धूरि धारा में लगत जिमि ।
थारा पर पारा पारावार यों हलत हैं ॥
{कवित्त मनहरण}
अर्थ :-
{शिवराय सैन्यासह युद्धास निघाल्यावेळचा देखावा कवी भूषणांनी वर्णिलेला आहे}
सिंहासम शूर शिवराय चतुरंग सैन्य तयार करून विरोचित उत्साहाने घोड्यावर बसून युद्ध जिंकण्याकरीता निघालेले आहेत, नगार्‍याचा भयंकर ध्वनि होऊ लागलेला आहे, उन्मत्त हत्तींच्या गंडस्थलातून निघणारा मद नदी नाल्यांच्या प्रवाहात मिसळत आहे, सैन्याच्या खळबळीने देशभर गल्लोगल्लीत कोल्हाळ माजून राहिला आहे, हत्तिंच्या एकमेकांवर रेलण्यामूळे डोंगर उलथून पडतात की काय असे वाटत आहे. सैन्याच्या खळबळीने व हत्तींच्या परस्पर रेटारेटीने उडत असलेल्या धुळीने आकाश इतके भरून गेले आहे की एवढा मोठा प्रचंड सूर्य, पण एखाद्या लहानशा तार्‍याप्रमाणे दिसू लागलेला आहे. समुद्र तर ताटात धावणार्‍या पार्‍याप्रमाणे सारखा आंदोलन पावत आहे.
इते गुन एक सिवा सरजामै


सुन्दरता गुरुता प्रभुता भनि भूषन होत है आदर जामै ।
सज्जनता औ दयालुता दीनता कोमलता झलकै परजामै ।
दान कृपानहु को करीबो करीबो अभै दीनन को बर जामै ।
साहन सो रन टेक विवेक इते गुन एक सिवा सरजामै !!

अर्थ -

भूषण म्हणतो सौंदर्य, गुरुत्व व प्रभुत्व हे गुण यांच्या ठिकाणी वसत असल्यामुळे आदरास पात्र झालेले आहेत; तसेच यांच्या ठिकाणी प्रजेविषयी सौजन्य, दयालुता, कोमलता दिसून येते; शत्रुंना तरवारीचेच दान व दीनांना अभय वर देण्याचे त्यांच्या अंगी सामर्थ्य आहे. बादशहांशी पण लावून युद्ध करणे आणि कोणतेही कार्य विचारपूर्वक करणे हे इतके गुण एका सर्जा (सिंहासमान शूर अशा) शिवरायांच्या ठिकाणी आहेत.
हिन्दुपति सेवाने


मन कवी भूषन को सिव की भगति जीत्यो
सिव की भगति जीत्यो साधु जन सेवाने ।
साधु जन जीते या कठिन कलिकाल
कलिकाल महाबीर महाराज महिमेवाने ॥
जगत मै जीते महाबीर महाराजन
ते महाराज बावन हू पातसाह लेवाने ।
पातसाह बावनौ दिली के पातसाह
दिल्लीपति पातसाहै जीत्यो हिन्दुपति सेवाने ॥
अर्थ -
कवी भूषणाच्या मनात शिवभक्तिने ,शिव भक्तिस साधूजनांच्या सेवेने, साधूजनास कलिकालाने,कलिकालास शूर आणि कीर्तिवान राजांनी आणि या शूर आणि कीर्तिवान राजास बावन्न बादशहास जिंकणार्‍या (औरंगजेबाने) आणि त्या बावन्न बादशहाच्या बादशहास म्हणजे दिल्ली पति औरंगजेबास "हिन्दू पति" शिवरायांनी जिंकले.
या छंदात कवि भूषणाने शिवाजी महाराजांना "हिन्दूपति" अशी उपमा दिलेली आहे. यावरूनच पुढील काळात मराठी साम्राज्याला हिंदुपतपातशाही म्हणण्याचा प्रघात पडलेला असावा.
आग्र्याहून सुटका -


चारि चारिचौकी जहाँ चकत्ताकी चहूं और,
साँज अरु भोर लगी रही जिय लेवा की ।

कँधे धरी कांवर, चल्यो जब चाँवसे,
एकलिए एक जात जात चले देवा की ।

भेंस को उतारी डार्‍यो डम्बर निवारी डार्‍यो,
धर्यों भेंस और जब चल्यो साथ मेवा की ।

पौन हो की पंछी हो कि गुटखान कि गौन हो,
देखो कौन भाँति गयो करामात सेवा की ॥


अर्थ -

चारी बाजूला या चुग़ताई वंशाच्या म्हणजेच औरंगजेबाच्या प्राणघातक चौक्या दिवसरात्र लागलेल्या आहेत. कावड खांद्यावर घेऊन एक एक जण मोठ्या डौलाने, अत्यंत आरामात देवाकडे निघालेले आहेत. अशा वेळी त्यांनी (शिवाजी महाराजांनी ) आपला वेष उतरवला, अवडंबर (जे आजारपणाचे अवडंबर माजवलं होतं ते) टाळलं, वेष बदलला आणि मेवा मिठाईच्या त्या पेटार्‍याबरोबर ते निघाले आणि पळून गेले. शिवाजी महाराजांची ही करामत बघून ( आग्र्याचे ) लोक थक्क झाले. त्यांना कळेना की ते (शिवाजी महाराज ) वार्‍याच्या झुळकीसारखे गेले की पक्ष्यासारखे उडून गेले की गुटखा खाऊन एकदम गुप्त झाले. शिवरायांच्या या करामतीला काय म्हणावे हे कोणांस कळेनासे झाले !
छाय रही जितही तितही अतिहि छबि छीरधि रंग करारी ।
भूषन सुद्ध सुधान के सौधनि सोधति सी धरि ओप उज्जारी ।
योंतम तोमहि चाबिकै चंद चहूं दिसी चाँदनि चारू पसारी ।
ज्यों अफजल्लहि मारि महीपर, कीरति श्री सिवराज बगारी ॥

अर्थ -

ज्या प्रमाणे क्षीर समुद्रात जिकडे दृष्टी फेकावी तिकडे शुभ्रच शुभ्र छबि पसरलेली दिसते किंवा चंद्राने अंधकारास ग्रासून शुभ्र चांदणे पसरावे व त्या प्रकाशात शुभ्र चुने गच्ची प्रासादांची जशी सुंदर शोभा दिसावी त्या प्रमाणे शिवाजी महाराजांनी अफजलखानास मारून पृथ्वीवर आपली उज्वल कीर्ति पसरवली.
चढत तुरंग चतुरंग साजि सिवराज ।
चढत प्रतापदिन दिन अति अंग मै ॥
भूषन चढत मरहट्टन के चित्त चाव ।
खग्ग खुलि चढत है अरिन के अंग मै ॥

भोसिलाके हाथ गढ कोट है चढत अरि ।
जोट है चढत एक मेरू गिरिसृंग मै ॥
तुरकान गन व्योमयान है चढत बिनु ।
मान है चढत बदरंग अवरंग मै ॥

अर्थ :-

चतुरंग सैन्य सज्ज करून शिवराज घोड्यावर स्वार होतांच त्यांचा प्रताप दिवसेंदिवस (समरांगणात) वाढतो आहे. भूषण म्हणतो, (इकडे) मराठ्यांच्या मनात उत्साह वाढू लागतो, (तो तिकडे) उपसलेल्या तरवारी शत्रूच्या छातीत घुसत आहेत. भोसल्यांच्या हाती (एका मागून एक) किल्ले येऊ लागले (वाढू लागले) तर तिकडे शत्रूंच्या टोळ्या एकत्र होऊन मेरूपर्वताच्या शिखरावर चढू लागल्या. तुर्कांचे समुदाय (युद्धात मरण मिळाल्यामुळे) विमानात बसून आकाशमार्गे जात आहेत (तो इकडे) अवमान झाल्यामुळे अवरंगजेब निस्तेज होत आहे.
सुनो नवरंगजेब....


किबले की ठौर बाप बादसाह साहजहाँ,
ताको कैद कियो मानो मक्के आगि लाई है ।

बडो भाई दारा वाको पकरि कै कैद कियो,
मेहरहू नाहि माँ को जायो सगो भाई है ।

बंधु तो मुरादबक्स बादि चूक करिबे को,
बीच ले कुरान खुदा की कसम खाई है ।

भूषन सुकवि कहै सुनो नवरंगजेब,
एते काम कीन्हे तेऊ पातसाही पाई है ॥

अर्थ :-

भूषण म्हणतो :- औरंगजेब ! ऐक. तू तुझ्या तीर्थासमान पूज्य असलेल्या आपल्या बापास शहाजनास कैद केले, हे तुमचे कृत्य परमपवित्र अशा मक्केस आग लावण्याइतकेच अनुचित आहे. एकाच आईच्या पोटी जन्मलेला, त्यातून वडिल बंधू जो दारा, त्यालाही पकडून कैदेत घातले. (यावरून मला वाटते) तुझ्या अंतःकरणात दयेचा लवलेश नाही; दुसरा भाऊ मुरादबक्ष याशी कपटाचरण न केल्याबद्दल कुराण घेऊन खुदाची खोटीच शप्पत घेतली. अशी ही कृत्ये केली म्हणून तर तुला बादशाही (राज्य) मिळाली आहे.
हात तसबीह लिए प्रात उठै बंदगी को


हात तसबीह लिए प्रात उठै बंदगी को,
आपही कपट रूप कपटसु जपके ।

आगरे में जाय दारा चौक में चुनाय लीन्हो,
छत्रहूँ छिनायो मानो मरे बूढे बाप के ।

कीन्हो है सगोत घात सो मै नाही कहौ फेरि,
पील पै तोरायो चार चुगुल के गप के ।

भूषन भनत छर छन्दी मतिमंद महा ,
सौ सौ चूहे खाय के बिलारी बैठी तप के ॥

अर्थ -

भूषण म्हणतो, हे औरंगजेब ! तुम्ही रोज सकाळीच उठून हातात स्मरणी घेउन ईश्वर प्राथना करता, पण हे सर्व ढोंग आहे, तुम्ही प्रत्यक्ष कपट रूपच आहात. कारण आग्र्यास जाउन आपल्या सख्या भावास - दारास तुम्ही चौकात जिवंत चिणले; जिवंत व वृद्ध बापास मृत समजुन त्याचे राजछत्र हिसकावून घेतले (व स्वतः राज्य करू लागला) ; मी आता अधिक सांगत नाही. आपल्याच गोत्रजांना चहाडखोर दुतांच्या नुसत्या चहाडयांवरुन हत्तीच्या पायाखाली तुडवून मारविले. तुम्ही मोठे धूर्त आहात ; धर्म शील आहोत असे दाखवता पण तुमच हे कपट शेकडो उंदीर खाऊन तपश्चर्या करणार्‍या मांजरा सारखेच आहे .

"वरील दोन छंदात कवीने औरंगजेबाचा ढोंगी स्वभाव व त्याची भयंकर कृत्ये वर्णन केलेली आहेत. भूषणाने जे छंद औरंगजेबाचे अभय घेऊन मग त्यास ऐकविले अशी आख्यायिका आहे."
दूरजन दार भजि भजि बेसम्हार चढी,
उत्तर पहार डरि सिवाजी नरिंन्द ते ।

भूषन भनत बिन भूषन बसन साधे,
भूखन पियासन है नाहन को निंन्दते ।

बालक अयाने बाट बीचही बिलाने कुम्हिलाने,
मुख कोमल अमल अरविंन्द ते ।

द्दगजल कज्जल कलित बढ्यो कढ्यो मानो,
दूजा सोत तरनि तनूजा को कलिन्द ते ॥


अर्थ -

भूषण म्हणतो, त्या नरवीर शिवरायांच्या भीतीने शत्रु स्त्रिया आपली वस्त्रे, भूषणे टाकून उपाशी तापाशी नवर्‍यांच्या निंदा करीत अनिवारपणे धावून उत्तरे कडील पहाडांवर, पर्वतांवर चढू लागल्या आहेत. अज्ञान बालकांची निर्मल कमलांप्रमाणे असलेली कोमल मुखे कोमेजुन गेली.मूले वाट चुकून भलतीकडेच निघून गेली. त्यामुळे त्यांच्या मातांच्या काजळ घातलेल्या डोळ्यातून अश्रूंचा जो प्रवाह सुरु झा तो कालिंद पर्वतापासून निघालेल्या यमुनेचाच दूसरा ओघ आहे की काय असे वाटायला लागले आहे.
तेग बल सिवराज देव राखे.......

वेद राखे विदित पुरान राखे सार युत राम नाम राख्यो अति रसना सुघरमे ।
हिन्दुनकी चोटी रोटी राखी है सिपाहिन की काँधे में जनेऊ राख्यो माला राखी गर में ।
मिडि राखी मुग़ल मरोरि राखे पातसाह बैरी पीसि राखे बरदान राख्यो कर में ।
राजन की हद्द राखी,तेग बल सिवराज देव राखे देवल स्वधर्म राख्यो घर में ॥
अर्थ :-
शिवरायांनी आपल्या तरवारीच्या जोरावर वेद आणि पुराणे यांचे संरक्षण केले, सर्वस्वाचे सार असे जे रामनाम ते हिंदूंच्या जिव्हेवर कायम ठेवले. हिंदूंची शेंडी राखली आणी शिपायांची रोटी (उपजिविका) चालवली. खांद्यावरील जानवी आणी गळ्यातील माळा सुरक्षीत ठेविल्या. मोगलांचे यथास्थित मर्दन केले. बादशहास मुरगाळून टाकले. शत्रूचे चूर्ण केले. इतके करून आपल्या हाती वर देण्याचा अधिकार ठेवला. देवळात देव व घरात कुलधर्म, कुलाचार कायम ठेवले.
अलि नवरंगजेब चंपा सिवराज है

कूरम कमल कमधुज है कदम फूल ।
गौर है गुलाब, राना केतकी विराज है ।

पांडुरी पँवार जूही सोहत है चन्दावत ।
सरस बुन्देला सो चमेली साजबाज है ।

भूषन भनत मुचकुन्द बडगूजर है ।
बघेले बसंत सब कुसुम समाज है ।

लेइ रस एतेन को बैठिन सकत अहै ।
अलि नवरंगजेब चंपा सिवराज है ॥

अर्थ :-

येथे भुषणाने औरंगजेबाच्या मांडलिक राजांना एकेका फुलाची उपमा दिली आहे.

जयपूरचे राजे कछवाह हे कमळाप्रमाणे , जोधपुरचे राजे कबंधज हे कदंबाप्रमाणे, गौड़ गुलाबाप्रमाणे तर उदयपूरचे राणे केतकी पुष्पाप्रमाणे आहेत. पवार पांढरीच्या फूलासारखे तर चंदावताचे राजे जुईच्या फूलाप्रमाणे, बुंदेले चमेलीसारखे, बडगुजर मुचकुंद फुलाप्रमाणे तर बघेले वसंतकाली फुलणार्‍या सर्व पुष्प समुहाप्रमाणे आहेत. औरंगजेब हा भूंगा आहे. भूंगा जसा फूलाफूलातून मध गोळा करतो तसा औरंगजेब या सगळया राजांकडून कर गोळा करतो. पण शिवराय चंपकपुष्पाप्रमाणे आहेत की ज्याच्या वाटेला भुंगा(औरंगजेब) कधीही जात नाही.

जाणता राजा

जाणता राजा
जाणता राजा