गर सिवाजी न होते तो...............
देवल गिराविते , फिराविते निसान अली ।
ऐसे डूबे रावराने , सबी गए लबकी ।
गौर गणपती आप , औरनको देत ताप ।
आपनी ही बार सब , मारी गये दबकी ।
पीरा पैगंबर , दिगंबर दिखाई देत ।
सिद्ध की सिद्धाई गई , रही बात रब की ।
कासी की कला गई, मथुरा मस्जिद भई ।
गर सिवाजी न होते तो , सुन्नत होती सबकी ॥
- कविराज भूषण.
मराठी अर्थ :-
यवनांनी मंदिरे पाडून त्या जागी अल्लाचा ध्वज फडकविला तेव्हा राव - राणे (राजे महाराजे) भयग्रस्त व पतित होऊन तोंडदेखील बाहेर काढत नव्हते. इतके ते निर्बल व निस्तेज झाले. थोडेसे पुजा विधान चुकले तर भक्तांनाच ताप देणार्या देवी, गणपती आदि देवदेवतांना आपल्यावरील या यावनी संकटांचा प्रतिकार करणे अशक्य वाटून लपून बसण्याची वेळ आली. सिद्धांची सिद्धि समाप्त होवून 'रबची' चर्चा सुरू झाली. जिकडे तिकडे पीर, पैगंबर, फकीर, अवलिया यांचेच साम्राज्य पसरलेले होते. काशी कळाहीन झाली, मथुरेला मशीद उभी राहीली, अशा स्थितीत जर शिवाजी महाराज झाले नसते, तर सर्व हिन्दुंची सुन्ता झाली असती.
No comments:
Post a Comment
Leave your comment here