धर्मवीर संभाजीला उपदेश
संभाजी महाराजांना रामदास स्वामी लिहितात-
अखंड सावधान असावें। दुश्चित कदापि नसावें।
तजविजा करीत बैसावें। एकांत स्थळी।।
मागील अपराध क्षमावे। कारबारी हातीं धरावे।
सुखी करून सोडावे । कामाकडे।।
श्रेष्ठीं जे जे मेळविले। त्यासाठी भांडत बैसले।
मग जाणावें फावलें। गलिमांसी।।
बहुत लोक मिळवावे। एक विचारे भरावे।
कष्ट करोन घसरावें। म्लेंच्छांवरी।।
आहे तितुके जतन करावें। पुढें आणिक मिळवावें।
महाराष्ट्र राज्य करावें। जिकडे तिकडे।।
शिवराजास आठवावें। जीवित्व तृणवत् मानावें।
इहपरलोकी रहावें। कीतीर्रूपे।।
शिवराजाचे आठवावे रूप। शिवराजाचा आठवावा प्रताप।
शिवराजाचा आठवावा साक्षेप । भूमंडळी।।
No comments:
Post a Comment
Leave your comment here